गुरुवार, १८ जून, २००९

साई सुट्ट्यो

काय गंमत असते नाही
ओम साई सुट्ट्यो म्हणताना
सगळ्यात पहीले सुटण्याची
कट्टी तर कट्टी बालंबट्टी
म्हणत रुसुन बसण्याची

पहिला पाऊस, मातिचा गंध
मनाच्या मोराचा नाच बेधुंद
पाण्यात सोडलेली कागदाची नाव
आजच का घेतेय काळजाचा ठाव?

सोडुन चाललेत एक एक साथी
म्हणुन का आठवली जपलेली नाती?
जपलेल्या सगळ्याचीच उजळणी झाली
डोळ्यातल्या आठवांची निर्माल्ये झाली

ओम साई सुट्ट्यो म्हणुन तू सुटून गेलीस
पाऊसवार्‍यात कागदी नाव अलगद सोडुन गेलीस
नात्यांचे सुटले जरी अलगद हात
खात्री बाळग, मी ही येईन टाकुन इथेच कात!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा