रविवार, २ जून, २०१३

माणसे

जंगले ही माणसांची
तरी बेट झाली माणसे
भिडती सिमा तरी ना
भेटती ही माणसे
ना जणू आली त्सुनामी
वाहिले नाही जणू
कोरडी इतकी कशाने
आज झाली माणसे?
टाळण्या अपघात येथे
काळजी घेती किती!
राखूनी अंतर स्वतःशीच
चालती मग माणसे
काय ह्यांच्या अंतरंगी?
कोणती ह्यांची लिपी?
वाचता येती न मजला
दुर्बोध इतकी माणसे
मी तरी कोठे निराळी?
जर पाहते परिघातूनी
अन म्हणे का कोण जाणे
कळलीच नाही माणसे