शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

ek kavitaa

सांग तुझ्या मनामधे
असे काय खुपतसे
का रे बहराच्या वेळी
पानगळ सतावते?

मळभ हे कोणते जे
मनभर पसरते
असे कोणते ग्रहण
वर्तमान झाकोळते?

कर स्मृतींची निर्माल्य
सोड हळूच पाण्यात
पुजा आजच्या क्षणाची
कर मन गाभाऱ्यात

मग होईल मोकळे
डोईवरचे आभाळ
आणि बहरेल पुन्हा
झाला ओसाड जो माळ













शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

एक उत्तर नसलेला प्रश्न



देवा, तू खरच खुप चतुर आहेस
मनात अपराधी भाव राहू नयेत
म्हणुन ना जाण्यापुर्वी तू नात्यांचे पीळ सोडवलेस?

अरे, पण आता मी काय करु?
अजुन बरीच नाती आहेत
पीळ कायम असलेली
पीळ सुटला की नात्यांचे बोटही सुटतेय
असा अंध का म्हणेनास पण विश्वास बसत चाललाय

त्याचे काय?

तुझ नसणं

तुझ नसणं आता

मनानेही स्विकारलय

पाऊलखुणांचा वेध घेण
तर केव्हाच बंद झालय

आठवांच्या कणांना
मी कधीचं मुक्त केलय

एखादा चुकार क्षण
वळिव बनुन बरसतो
इतकच

बाकी काहीच नाही





रायटर्स ब्लॉक

काय गं रायटर्स ब्लॉक सतावतोय का?
काही लिहीलं नाहीस बरेच दिवसात?

तिच्या प्रश्नावर माझा मोठ्ठा पॉज

काय सांगणार तिला?
पुर्वी बरच काही खदखदायचं
एका क्षणी मग उतु जायचं

तितक्या तीव्रपणे आता
खदखदतच नाही
मनाचा तळही
ढवळून निघत नाही

तू म्हणतेस,
"काही लिहिलं नाहीस बरेच दिवसात?"

आणि आई म्हणते,
"रुळली माझी बाय शहरात"