शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

ek kavitaa

सांग तुझ्या मनामधे
असे काय खुपतसे
का रे बहराच्या वेळी
पानगळ सतावते?

मळभ हे कोणते जे
मनभर पसरते
असे कोणते ग्रहण
वर्तमान झाकोळते?

कर स्मृतींची निर्माल्य
सोड हळूच पाण्यात
पुजा आजच्या क्षणाची
कर मन गाभाऱ्यात

मग होईल मोकळे
डोईवरचे आभाळ
आणि बहरेल पुन्हा
झाला ओसाड जो माळ













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा