शुक्रवार, २२ जून, २०१२

एक उत्तर नसलेला प्रश्न



शेवटचा अध्याय
कधीचाच सुरु झालाय
हे कळलंय केव्हाच,
पचवलय ही हळू हळू
पण नेमकी किती प्रुष्ठसंख्या?
हेच तेव्हढं ज्ञात नाही
अज्ञानातत सुख असतं
असही म्हणता येत नाही
प्रत्येक क्षणीचा हा ताण
टाळताही येत नाही
नी विश्वास टाकून तुझ्या वर
निर्धास्त होणं जमत नाही
काय करु? तुच सांग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा