बुधवार, २ फेब्रुवारी, २०११

ती सांज हरवूनी गेली


ती सांज हरवूनी गेली
जी कधी भावली होती

स्पर्शाची अनवट गोडी
अन नि:शब्दाची बोली
मज जिने शिकवली होती
ती सांज हरवूनी गेली..

काळाच्या लाटेमधे
ती सांज वाहूनी गेली
जाताना आठवणींची
ती नक्षी ठेवूनी गेली

ती गेली हरवून आणि
मी वाट हरवुनी बसले
मौनाची कोणती बोली?
मी शब्दही विसरुनी गेले

रात्रीची वाटता भिती
मग मिटून मी ही गेले
पिंजरा घालुनी भवती
मी त्यातच मग फ़डफ़डले

कढ दाटूनी येतो जेव्हा
मज सोबत करते नक्षी
मग उडूनी जातसे तेव्हा
मन पिंजर्‍यातला पक्षी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा