मंगळवार, २२ एप्रिल, २०१४

निकाल

सहजीवनाचं एक तप उलटलं
नाविन्याच्या काळात वाटणारं
अद्वैताचं गारुड हळुहळू उतरत गेलं
तरीही नात्याची गरज अजूनही शिल्लक आहे
ह्या समजुतीपाशी घोटाळावं?
कि सवयीचा भाग सारा म्हणत
गरजेचही अस्तित्व पुसून टाकावं?
तुझ्या ह्या प्रश्नाचं माझ्याकडे
उत्तरच नव्हतं
पाच पैकी कोणत्याही चार प्रश्नांची उत्तरं
लिहायचा पर्याय इथे नव्हताच, नाहीतर
नक्कीच निकाल काही वेगळा असता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा